’भारतापासून आम्हाला वाचवा’   

पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला 

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानी नागरिकांच्या मनावर एवढा झाला की, पाकिस्तानच्या संसदेत एक खासदार या परिस्थितीवर भाष्य करताना ढसाढसा रडला. ताहिर इक्बाल असे या खासदाराचे नाव आहे. 
 
ताहिर इक्बाल यांची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाली आहे. याआधी पाकिस्तानची एक न्यूज अँकर पाकिस्तानातील परिस्थिती पाहून रडली होती. पाकिस्तानच्या वास्तवावर दुःख व्यक्त ताहिर इक्बाल म्हणाले, मी सर्वांना आवाहन करतोय की, एकत्रपणे आपण परिस्थितीला सामोरे जाऊ. आपल्याकडे खूप कमतरता आहे. आपण असहाय्य आहोत. आपण दोषी आहोत. अल्लाह आम्ही तुझ्यासमोर माफी मागतो, तू दयाळू आहेस. तुझा आशीर्वाद असेल तर आम्ही विजयी होऊ. अल्लाह आम्हाला भारतासोबत सामना करण्याची ताकद दे, असे म्हणत ते जोरजोरात रडत आहेत.
 
ताहिर इक्बाल हे पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे खासदार आहेत. ते पाकिस्तानी सैन्यात मेजर राहिले आहेत. दरम्यान, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली होती; परंतु पाकिस्तानची स्थिती किती पोकळ आहे, हे या खासदारांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
 

Related Articles